वेळ ही बघ ना.......
कसा व्यवहार करून गेला.....
तारूण्य देऊन हाती.....
बालपण घेऊन गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वडाच्या पारंब्याचे झोके.....
आठवुन गेले...
बालमित्राचे डोळेही...
मग दाटुन गेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपण पुन्हा.....
परतुन ते आले.....
बालपणिच्या मित्राला....
भेटणे जेव्हा झाले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाळेची ती घंटा.....
पहीले पळण्याची ओढ.....
आठवण आजही...
आहे किती ती गोड...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोन बोट जोडता....
मैत्री पुन्हा व्हायची....
आता ही निरागसता....
कुठे ती यायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपणीचा मीत्र येतांना...
बोर चींच घेऊन रे आला.....
वाटून ते खाता मात्र....
समाधान तो बालपणीचा होता हरवला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सख्यांसोबतची ती गंम्मत...
कागदाची ती होडी.....
बालपणिच्या त्या पाऊसाची....
वेगळीच होती रे गोडी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपणीचा मित्र नि मैत्री....
जिव्हाळ्याची रे खात्री....
प्रेम निरपेक्ष निखळ.....
आनंदचं ते रे आगळ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपणिच्या मित्रा सांगना.....
आठवते का कट्टी बट्टी.....
निरागस पणा हरवता.....
का होतात सगळे रे हट्टी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तहान एकाला लागायची.....
नी सगळ्यांनी ते जायचं ....
बालपणीच्या मीत्रा सांग ना....
असं का पुन्हा जगता यायचं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लीमलेटची एक गोळी......
वाटुन कशी सगळे खायचो....
कुठ हरवल ते समाधान...
सांग ना आता का नाही रे तस जमायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपणिचा मीत्र....
आताच गं भेटला....
किती बदलली म्हणता....
हक्काने होता भांडला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपणाचे मीत्र...
दुनियादारीत गमले....
वेळ नाही म्हणत.......
सगळे संसारात रमले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️